रानावनात उगवणारं अन रानावनातच झीजणारं..
उन्हाळ्यात सुरकुतणारं - पावसाळ्यात भरकटणारं..
चारचौघांसारखंच असणारं अन चारचौघांसारखंच दिसणारं..
पण एक दिवस काहीतरी वेगळंच घडलं..
आज सगळ्यांची नजर त्या पात्याकडे वळली..
आज ते पातं कुणाच्या चित्रात जाउन बसलं तर कुणाच्या आठवणींत..
कुणा कवीच्या कवितेत दिसलं, तर कुणा लेखकाच्या लेखात हसलं..
कारण..
कारण, आज त्या पत्यावर दंव बरसलं होतं.. एका दंवबिंदूने त्या पात्याला नवीन स्वरूप दिलं होतं..
आज ते पातं स्वतःशीच हसत होतं, मनाशीच खुलत होतं..
आता उन असो वा पाउस, रात्र असो वा दिवस..
त्या दंवाने त्या पात्याला फक्त आणि फक्त खुश रहायला शिकवलं होतं..
आज त्या दंवाने त्या पात्याला स्वतःचं अस्तित्व मिळवून दिलं होतं..
मीसुद्धा अगदी तसाच होतो गं..
त्याच त्या गवताच्या पात्यासारखा..
अस्तित्वाला विसरलेला, स्वाभिमानाला दुरावलेला..
दुःखात निराश होणारा अन सुखात हरवून जाणारा..
चारचौघांसारखा असणारा आणि चारचौघांसारखाच दिसणारा..
माझ्या अशा नेहमीच्या जगण्याला सोनेरी किरण दिल्याबद्दल आणि मला तुझा मानण्याबद्दल शतशः धन्यवाद..
ही मैत्री, आपलं प्रेम, हे नातं असंच निखळ राहो हीच माझी सप्रेम सदिच्छा..
- संदीप
:) मस्त रे संदीप!
ReplyDeleteKeep it up!
lai Bhari...!!!
ReplyDeleteअतिशय सुंदर लिहिलयंस रे ..!!
ReplyDeleteखासकरून गवताच्या पात्याची आणि दवाची उपमा फारच भावली.
keep it up..!
khup chaan
ReplyDeleteWell just happened to read your blog... its nicely written & presented. I liked it... Keep up the good work..
ReplyDeletekhup chan ... khup avadli post .. agdi manatla bollas..!
ReplyDelete