संजीवन समाधी दिनानिमित्त (कार्तिक वद्य त्रयोदशी) सुरू केलेला विषय हा, अनेक दिवस झाले, नीट काही सुचतच नव्हतं. अचानक एका रात्री माझ्या कल्पनेतही नसताना संपूर्ण कविता एकटाकी लिहून झाली.
ज्ञानेश्वर लिहितात रोजनिशी
त्यात हिशोब दुनियेच्या पापाचा
ज्ञानदेव म्हणती आता आसरा
फक्त रखुमादेविवरु बापाचा
लोक येती, लोक जाती
इडा पिडा सांगुनी म्हणती
ज्ञानदेवो आम्हावर कृपा करा
यातून उपाय काय तो सांगा
ज्ञान म्हणे निवृत्ती हाच मार्ग
सोपान त्यास, ज्यास आस
मुक्त होण्यास एकच उपाय
ज्ञानदेव वदती दुनियेस
तद्वत ज्ञानेश्वर सांगती उपाय
विठ्ठल तोच तरणोपाय
लिहितो त्याची रोजनिशी
त्याच्याच जावे चरणांशी
तरी तुम्ही-आम्ही चांगदेव
ज्ञान-गर्व-दंभ आपणास
त्या ज्ञानियाची वाणी हाच
आपल्या सुटकेचा मार्ग खास
जरी वाचली ज्ञानेश्वरी लक्ष वेळा
परी करुण्याचा पाझर ना फुटला
कैसा हा ज्ञानाचा अपमान केला
त्या रचियत्याला दुःखी केला
ज्ञानदेव लिहिती रोजनिशी
देवा सांगती पृथ्वीवरचे पाप
म्हणती विठ्ठला सोडव रे
असह्य झाला हा ताप
कंटाळा आला रोज तेच
ऐकण्याचा, लिहिण्याचा
कंटाळा आला आता देवा
तुझ्याशिवाय राहण्याचा
संजीवन ती समाधी विठ्ठला
म्हणती ज्ञानदेव उपाय एकला
ईश्वराचे ज्ञान वाटून लोकां
निघाले स्वोजस परलोका
रोजनिशी लिहिण्यास आता
विठ्ठल शोधी ज्ञानी सकल
परि एकही ना सापडे त्यांस
ब्रह्मांडनायक होतसे हतबल..
- समीर
खूप सुंदर समीर... छान जमलीये
ReplyDelete- प्राची बोरकर
माऊली सुंदर.
ReplyDeleteKhup sundar.Hats off to u.
ReplyDelete